मूळव्याध आजाराचा त्रिसूत्रि उपचार ? – Anupam Ayurveda
मूळव्याध आजाराचा त्रिसूत्रि उपचार ?

12 July 2022

Dr. Shivkumar Gore

मूळव्याध आजाराचा त्रिसूत्रि उपचार ?

आजच्या कम्प्युटर युगात मानवाने अफाट प्रगती केली, अफाट ज्ञानाचे भंडार उपलब्ध झाले. गेल्या 30 ते 40 वर्षात लाइट नसल्यापासून ते लाइट, टीव्ही, टेलीफोन, मोबाइल, इंटरनेट इत्यादि वेगवेगळया क्षेत्रात आपण अद्ययावत होत चाललो आहोत. ही प्रगती अखंड चालणार आहे. पिढ्यांनपिढ्या बदलणार आहे.परंतु बदलणार नाही ती आपली पचनसंस्था व तिची घ्यावयाची काळजी. तेथे होणारे आजार व आजार पुन्हा होऊ नये म्हणून प्रतिबंधक आहार व विहार.

1-मूळव्याध झाल्यावर आग होणे, रक्त पडणे, मोड बाहेर येणे, इ.लक्षणे दिसतात. रुग्ण मग घरगुती उपचार करतो. मग शेजारी, मित्र, मेडिकल येथून औषधी घेतो. नंतर फॅमिली डॉक्टर कडून उपचार घेतो.बर्‍याच वेळा या प्रकारामध्ये शौचाची जागा PER RECTUM ,PROCTOSCOPY ,DIGITAL EXAMINATION ई. प्रकाराने कोणीही तपासत नाही. त्यामुळे शौचाच्या जागी होणार्‍या 12 आजारापैकी कोणता आजार आहे त्याचे योग्य निदान होत नाही .

बर्‍याच वेळा आजार फार थोडासाच असतो,तो थोड्याशाच औषधाने बरा सुद्धा होतो .परंतु योग्य निदानाअभावी आजार बराच होत नाही. जवळपास 70 % रूग्णाला योग्य तपासणी व योग्य उपचार वेळीच केल्यास पुढे कोणत्याही ऑपरेशन ची गरजच पडत नाही हा आमचा 20 वर्षाचा अनुभव आहे.

2. क्षारसूत्र ,क्षारकर्म, injection, ऑपरेशन —ज्यावेळी प्राथमिक अवस्थेत योग्य उपचार न केल्यास पुढील उपचाराची गरज पडते. काळानुसार संशोधन वाढत गेल्याने वेगवेगळी उपचार पद्धती येत आहे.रुग्णाणे तपासल्यानंतर आजाराच्या गरजेनुसार उपचार ठरवावा लागतो. सर्व रुग्णांना एकच उपचार लागू होत नाही.कारण तेथे PILES, FISSURE, ABSCESS, FISTULA , PILONIDAL SINUS, POLYP, CANCER, ETC. 12 प्रकारचे आजार व प्रत्येक आजारचे 3 ते 4 प्रकार असे मिळून 50 लक्षणे होतात. जर साधे मोबाइल चार्जर सुद्धा एका मोबाइलचे दुसर्‍याला चालत नाही तर 50 लक्षणाला एकच उपचार कसा चालेल.

आयुर्वेद शाश्रामध्ये 2400 वर्षापासून या सर्व आजारबद्दल सविस्तर वर्णन केलेले आहे. प्रत्येक आजारानुसार क्षारसूत्र, क्षारकर्म, प्रतिसारणीय क्षार, अग्निकर्म इ.उपचार आहेत. जर योग्य लक्षणाचा योग्य उपचार केल्यास आजार कायमस्वरूपी बारा होतो व शौचाच्या जागेचे नियंत्रण जाण्याचं धोका राहत नाही. आजार पुन्हा पुन्हा होत नाही.

3. अपुनर्भव चिकित्सा – खरोखर आयुर्वेद किती महान आहे, परंतु त्याचा योग्य उपचार करणारे व योग्य उपचार करून घेणारे ह्या दोघांची कमतरता आहे. आयुर्वेदिक उपचार करणारा वैद्य ,डॉक्टर व उपचार घेणारा रुग्ण हा समर्पित असला पाहिजे .

आयुर्वेद शास्रामध्ये कोणत्याही आजारचा उपचार झाल्यानंतर तो आजार किंवा त्या संबंधित दूसरा आजार पुन्हा होऊ नये म्हणून अपुनर्भव चिकित्सा सांगितली आहे. मूळव्याध आजारचे मूळ पचंनक्रियेशी आहे. येथे constipation हा आजार, उष्णता, पोट साफ न होणे ईत्यादीसाठी 1 ते 2 महीने औषध घेतले म्हणजे पचन संस्था निरोगी राहून पुन्हा आजार होत नाही. अशा प्रकारे मूळव्याध ई आजारचा हा त्रिसूत्रि उपचार आहे॰