मूळव्याध – Anupam Ayurveda
मूळव्याध

23 July 2022

Dr. Shivkumar Gore

मूळव्याध

गुदभागी असणा-या रक्तवाहिन्या फुगून त्या ठिकाणी कोंब तयार होतात, त्याला मूळव्याध म्हणतात. गुदभागी मुळव्याधाशिवाय फिशर, भगंदर,गुदग्रंथी इ.आजारही होत आहेत परन्तु रुग्णांना त्याविषयी पुरेशी माहितो नसल्याने त्या ठिकाणी होणा-या प्रत्येक आजाराला ते मूळव्याध समजतात.

मूळव्याध का होतो?

मलबध्दता, जड आहार सेवन करणे, सतत एका जागी बसणे, सतत उभे राहणे, वारंवार मल विसर्जन करणे, सतत प्रवास, लठठपणा, आनुवंशिकता इत्यादी.

मुळव्याध आनुवंशिक असतो का?

मूळव्याध या आजारात आनुवंशिकता हे कारण काही रुग्णांमध्ये अंशतः आढळते. जन्मजात अशक्तपणा, गुदगत व्हेन्स मध्ये कपाटिका अनुपस्थित असणे, गुदभागी असलेले चसमगने जन्मतः विस्फारलेले असणे इत्यादी कारणांमुळे क्वचित प्रसंगी जन्मतःच आढळतात. परंतु एकाच कुटुंबात अनेकांना या व्याधी होण्यास कारण त्यांचे चुकीचा आहार-विहार व इतर कारणात समानता असणे ह॑ असते.

मुळव्याधाची लक्षणे काय असतात?

मलप्रवृ्तीनंतर थेब-येब किंवा रक्‍ताची चिळकांडी उडणे, रक्ताची धार लागणे, शौचाच्या वेळेस मांसल गोल आकाराचा भाग बाहेर येणे व शौचानंतर परत आत जाणे किंवा कालांतराने आत जाणे किंवा तसेच बाहेर राहणे किंवा बाहेर आलेला मांसल भाग हाताने मध्ये ढकलावा लागणे व कपडयाला रक्ताचे डाग पडणे अथवा चिकट स्त्राव लागणे.

मूळव्याध या आजारावर कोणकोणते उपचार आहेत?

मूळव्याधाचे कोंब ज्यावेळी प्राथमिक अवस्थेत असतात व रक्तस्राव  अत्यल्प असल्यास औषधी उपचार व पथ्यपालन करण्याने फरक पडतो. रक्तस्राव जास्त होत असेल किंवा कोंबाचे बाहेर येण्याचे प्रमाण वाढल्यास मूळव्याधीचा उपचार करावा लागतो.

 आधुनिक शास्त्रांमध्ये मूळव्याधीवर उपचार करण्यासाठी इंजेक्शन थेरपी, स्टेपनर लेजर, कठभ्‌ स क्रायोसरनरी इ. पध्दतीने उपचार केले जातात. यामध्ये दरवर्षी नवनवीन पध्दतीची भर पडत आहे. परंतु  प्रत्येक पध्दतीला काहीतरी मर्यादा आढळून येतात व उपचार पूर्णत यशस्वी होण्यास मर्यादा येतात.

 

आयुर्वेदशास्त्र सुमारे सहा हजार वषापूवी क्षारकर्म, क्षारसूत्र, अग्निकर्म इ. उपचाराचे सविस्तर वर्णन आहे. त्याच उपचारावर संशोधन करून मूळ तत्व न सोडता फक्त 30 मिनिटांमध्ये उपचार शक्य आहे. यामध्ये कोणतीही अवस्था व इतर हदयरोग, मधुमेह, थॉयराईड, स्त्रियांचे आजार इ. व वयाच्या 85 ते 90 वर्षे वयापर्यंत उपचार केला जातो. यामध्ये कोणताही नियंत्रण जाण्याचा धोका नाही.

ऑपरेशननंतर कंट्रोल  जातो का?

गुदमार्गाच्या ठिकाणी चीपदबजमत डनेबसम या नावाचा एक स्नायु असतो, जो शौचास नियंत्रण करतो, दुर्देवाने शस्त्रक्रिया करताना कधी कधी कट झाल्यास शौचावरचे नियंत्रण जावू शकते. आयुर्वेदिक क्षारसूत्र  उपचार करताना अशाप्रकारे नियंत्रण जाण्याची शक्यता नसते.

मुळव्याध पुन्हा-पुन्हा हा होतो ऑपरेशन फेल का जातात?

मुळव्याध उपचार, ऑपरेशन एकदा केल्यानंतरही त्याची मलबध्दतेसारखी मूळ कारणे चालू राहिल्यास काही काळानंतर पुन्हा मूळव्याधाचा त्रास होण्याची शकयता असते.

एका आजारामुळे दुसरा होतो का?

गुदभागी 12-13 वेगवेगळे आजार होतात. बरीचशी कारणे सारखीच असल्याने ब-याचदा एकापेक्षा जास्त आजार एकत्रितरित्या आढळतातय पण याचा अर्थ एका आजारामुळे दुसरा होतो असे नाही.

वेळीच उपचार न केल्यास कॅन्सर होतो का?

नाही. मुळव्याध व कॅन्सर होण्याची कारणे व पॅथॉलॉजी वेगवेगळी आहेत. त्यामुळे बराच जुना मूळव्याध असला तरी कॅन्सरची भीती नसते. याउलट मृळव्याधाचा इतिहास असतानाही एखादया रुग्णास कॅन्सर आढळू शकतो, म्हणजे काही स्वयंघोषित डॉक्टर मूळव्याध आजाराला कॅन्सरची भीती देतात.

कायमस्वरूपी उपचार आहेत का?

होय, आजाराचे निदान करुन उपचार हा डॉक्टरांनी ठरवावा व मूळव्याधीची अवस्था पाहून उपचाराचा निर्णय घ्यावा.

मूळव्याचीच्या ऑपरेशनची रुग्णांच्या मनात भीती का असते?

1985-90 पर्यंत ऑपरेशन पद्धत प्रचलित होती. त्याकाळी ऑँपरेशनंतर रुग्णांचा कंट्रोल जाण्याचे प्रकार

आढळत. त्यामुळे रुग्णांच्या मनात ऑपरेशनबद्दल भीती निर्माण झाली. त्यानंतर इतर पध्दती हळूहळू वापरात येवू लागल्या, परन्तु प्रत्येक पध्दतीमध्ये काही मर्यादा असल्याने सर्व रुग्ण त्या पद्धतीने पूर्णतः बरे होत नाहीत. पुन्हा आजार झाल्यामुळेही रुग्णांच्या मनात ऑपरेशनविषयी भिती व गैरसमज निर्माण झाले. या सर्व बाबीचा विचार करता रुग्णांचा खर्च, त्रास व वेळ वाचवण्यासाठी आयुर्वेदिक क्षारसूत्र पद्धती  मूळव्याधीवरील उपचारासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.